पोस्ट्स

मगर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ९७ : सेहराव मधील शंखचूडेश्वर , शूलपाणी गुंफा व हरी गिरी साधू

इमेज
 पुढे निघाल्यावर लक्षात येऊ लागले की आता झाडी सुरू झाली आहे . अंधार ही हळूहळू वाढू लागला . पुढे कुठलेच गाव किंवा घाट असल्याचे चिन्ह दिसेना . आता मात्र संकटात सापडतो की काय असे वाटू लागले . एकतर पुन्हा खोल पाणी सुरू झाल्यामुळे मगरींचा वावर वाढला होता . त्यात अंधार पडायला सुरुवात झाली होती . त्यात दोन-तीन भयंकर ओढे नाले आडवे आले . एक तर फार खोल होता . तो पार करून पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते . मी एका झाडाच्या मुळाला लटकून कसाबसा खाली उतरलो . परंतु माझ्यासोबत विठ्ठल महाराज पठाडे होते . त्यांना थोडे कठीण जाऊ लागले . मी झोळी खाली ठेवून पुन्हा वर गेलो . त्यांचे सामान घेऊन खाली आलो . मग पुन्हा वर गेलो आणि त्यांना घेऊन खाली आलो ! हे करताना माझ्या लक्षात आले की तो ओढा सुरुवातीला जितका कठीण वाटत होता तितका पुढच्या वेळी वाटला नाही ! आयुष्याचे असेच आहे ! एखादी गोष्ट नवी-नवी करताना कठीण वाटू शकते . एकदा सरावाची झाली की सोपी वाटू लागते . नर्मदा परिक्रमेतील कठीण मार्गांचे गणित असेच आहे . प्रथमच सर करताना तुम्हाला कदाचित ते कठीण वाटतील . परंतु सरावाने तुम्हाला माहिती होते की हे वाटते तेवढे कठीण नाह

लेखांक ९६ : गुजरातमधील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेच्या दक्षिण तटावरील मार्गक्रमणा

इमेज
 श्रीराम नामक त्या तरुण आचाऱ्याच्या हातचा महाप्रसाद घेऊन रामपुरा सोडले . पुन्हा एकदा किनारा पकडला . इथून काठाने चालण्याचा रस्ता जवळपास अशक्य या कोटीतला आहे . त्याचे महत्त्वाचे कारण असे की इथे फक्त माती किंवा फक्त दगड नसून मातीत कालवलेले दगड आहेत ! गेली लाखो वर्षे नर्मदा मातेने वाहून आणलेल्या गाळाच्या मातीमध्ये नर्मदेचीच जाडसर वाळू कालवून तयार झालेले कठीण वालुकाश्म युक्त खडक येथे आहेत . यातील एकेक खडा एकेक इंचाचा आहे . त्यामुळे याच्यावरून चालताना पायांची कसरत होते . बर हे वाळूचे टिले सरळ नसून मध्ये येऊन मिळणाऱ्या असंख्य ओढ्यांमुळे कधी दहा फूट ,कधी पंधरा फूट , तर कधी तीस फुटापर्यंत खोल गेलेले आहेत . इथे घाटावरती मला एक परिक्रमा असे भेटले . महाराष्ट्रातील नगरच्या पाथर्डी या गावचे हे परिक्रमावासी वारकरी सांप्रदायिक होते . विठ्ठल महाराज पठाडे असे त्यांचे नाव . त्यांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसले म्हणून मी विचारले की बाबाजी काय झाले ? ते मला म्हणाले की त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा देखील पूर्ण करायची आहे आणि आषाढी वारी देखील गाठायची आहे . तरी कसे करावे याचा प्रश्न त्यांना पडला आह