पोस्ट्स

घोडाघाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ३८ : गोंड राजा अक्करायाची राजधानी रामनगर

इमेज
गेल्या ४८ तासात मी आजवरचे सर्वाधिक अंतर चाललो होतो . आपल्या माहिती करता मी पार केलेल्या गावांची नावे देत आहे . डिंडोरी ,सुबखर रैयत , धूरी रयत , गांगपुर माल , औराई माल ,रायपुरा माल , इमली माळ , इमली रयत , छपरी रयत , सलैया रयत ,किसलपुरी माळ , केवलारी रयत , भैंसवाही रयत , सक्का माळ , सक्का रयत , कचनारी रयत , राई रयत , हर्रा टोला , धानगांव , खम्हरिया , आण्डिया माळ , चाबी , खैरी माळ , खैरी रयत , तेडिया नाला , खाल्हे गिठौरी , मोहगांव , अण्डियादार जर , उमरदी , मोहगाव , बिन्झी , इंद्र माळ , बनियातारा , सुडगाव , डोंगरगाव , देवगांव संगम ! भारतामध्ये जर सुपीक जमीन असेल आणि पाण्याची भरपूर उपलब्धता असेल किंवा नदी जवळ असेल तर साधारण दोन किलोमीटर वर गाव बदलते . वनक्षेत्र किंवा दुष्काळी क्षेत्र असेल तर गावांचा आकार मोठा असतो व लोकसंख्या कमी असते . छोटी शहरे साधारण तीन चार किलोमीटर व्यासाची असतात . मध्यम शहरे पाच ते सहा किलोमीटर व्यासाची असतात . महानगरे दहा ते बारा किलोमीटर आकाराची असतात . अर्थात ही ढोबळ रचना मी सांगतो आहे . देश काल परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो . वरील बहुतांश गावांमध्ये वनवासी जाती जमात