पोस्ट्स

चाबी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लेखांक ३८ : गोंड राजा अक्करायाची राजधानी रामनगर

इमेज
गेल्या ४८ तासात मी आजवरचे सर्वाधिक अंतर चाललो होतो . आपल्या माहिती करता मी पार केलेल्या गावांची नावे देत आहे . डिंडोरी ,सुबखर रैयत , धूरी रयत , गांगपुर माल , औराई माल ,रायपुरा माल , इमली माळ , इमली रयत , छपरी रयत , सलैया रयत ,किसलपुरी माळ , केवलारी रयत , भैंसवाही रयत , सक्का माळ , सक्का रयत , कचनारी रयत , राई रयत , हर्रा टोला , धानगांव , खम्हरिया , आण्डिया माळ , चाबी , खैरी माळ , खैरी रयत , तेडिया नाला , खाल्हे गिठौरी , मोहगांव , अण्डियादार जर , उमरदी , मोहगाव , बिन्झी , इंद्र माळ , बनियातारा , सुडगाव , डोंगरगाव , देवगांव संगम ! भारतामध्ये जर सुपीक जमीन असेल आणि पाण्याची भरपूर उपलब्धता असेल किंवा नदी जवळ असेल तर साधारण दोन किलोमीटर वर गाव बदलते . वनक्षेत्र किंवा दुष्काळी क्षेत्र असेल तर गावांचा आकार मोठा असतो व लोकसंख्या कमी असते . छोटी शहरे साधारण तीन चार किलोमीटर व्यासाची असतात . मध्यम शहरे पाच ते सहा किलोमीटर व्यासाची असतात . महानगरे दहा ते बारा किलोमीटर आकाराची असतात . अर्थात ही ढोबळ रचना मी सांगतो आहे . देश काल परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो . वरील बहुतांश गावांमध्ये वनवासी जाती जमात

लेखांक ३७ : घनदाट जंगलातली चाल आणि नर्मदा बुढी माय संगम

इमेज
दिंडोरी शहरांमध्ये फारसे काही पाहण्यासारखे नव्हते . आणि इथला एकूण बकालपणा अस्वस्थ करत होता त्यामुळे लवकरात लवकर तिथून पुढे निघालो . इथे संघसंचलित इमलय कुटी नावाचा एक आश्रम आहे . बळीराम जाधव ला तो आश्रम बघायचाच होता . परंतु बाहेरून आश्रमाला कुलूप होते आणि आत मध्ये वनवासी मुले खेळत बसली होती . मी दारापाशी जाऊन चौकशी केली परंतु लॉकडाऊनमुळे आश्रम उघडणार नाही असे सांगण्यात आले . त्यामुळे त्या आश्रमाबाबत अधिक माहिती घेण्याची आमची संधी हुकली . संघ संचलित इमलय कुटी वनवासी आश्रमातील विद्यार्थी ( संग्रहित छायाचित्र ) इथून पुढे काठा काठा ने चालण्याचा मार्ग बंद झाला . दिंडोरी गावानंतर नर्मदा मैया चक्क ९० अंशाचे वळण घेत काटकोणात वळते .या भागातून कोणीच परिक्रमावासी जात नाही असे आम्हाला जागोजागी सांगण्यात आले .पुढचा मुक्काम देखील जवळपास कुठे नव्हता .त्यामुळे भरपूर चालायची तरी ठेवा असे सर्वजण सांगत होते . त्यामुळे पायांनी गती घेत निघालो . मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ एका ब्राह्मणाचा धरम काटा अर्थात वे ब्रिज होता . त्याच्यावरती भरलेल्या ट्रकचे वजन केले जात असल्यामुळे याची अचूकता साधारण पाच किल