पोस्ट्स

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला

लेखांक १३० : अट्ठयाच्या जंगलातला हल्ला , सेवाभावी भावसिंह अवलसिंह वास्केला आणि साकडीचा मेंगला पैरान सस्तिया

इमेज
(अपूर्ण ) मध्यप्रदेशातल्या अलीराजपुर जिल्ह्यातल्या सोंडवा तालुक्यातले मथवाड गाव सोडले आणि उन्हाचा दाह जाणवू लागला . सकाळी सात वाजल्यानंतर उन्हाचे चटके बसू लागायचे . चालताना नको नको व्हायचे ! दक्षिण तटावरून चालताना सूर्य सकाळी पाठीशी असायचा . उत्तर तटावर तर सूर्याची उन्हे थेट डोळ्यावर यायची ! दक्षिण तटावर सूर्य जणू काही सांगायचा ! चालत रहा मी तुझ्या पाठीशी आहे ! मानेला भयानक चटके बसायचे . त्यामुळे गळ्यातला रुमाल मानेवर झाकून घ्यायचो . उत्तर तटावर मात्र सूर्य सतत समोर असायचा . त्यामुळे डोळ्याला अंधारी यायची . देहाकडे लक्ष नव्हतेच . पण लक्ष गेल्यावर लक्षात यायचे की आपला रंग आयुष्यात कधी नव्हे इतका काळवंडला आहे. म्हणजे आरशात बघायची संधी कधी मिळत नसे परंतु हाताच्या रंगावरून लक्षात यायचे . यालाच म्हणतात तापणे किंवा तप घडणे ! मैया परिक्रमावासीला रताळ्यासारखी भाजून उकडून काढते ! आधी ताप ताप तापायचे ! आणि मग अचानक मैया मध्ये बुडायचे ! सगळेच टोकाचे ! पण तीच सहनशक्ती देते . तीच तुम्हाला बळ देते . तीच तुमची रक्षणकर्ती असते . आपल्याला फक्त या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नसतो . आज एक असा प्रसंग आला की

लेखांक १२९ : शूलपाणी झाडीच्या उत्तर तटावरील राणीकाजल माता आणि मथवाडची नेहा

इमेज
नर्मदा मातेच्या उत्तर तटावरून माझी मार्गक्रमणा सुरू होती . हांफेश्वर ओलांडले म्हणजे उत्तर तटावरील शूल पाणीच्या झाडीचा मध्यभाग आला होता . वरील नकाशा मध्ये हिरव्या रंगाने दाखवलेला भाग म्हणजे शूलपाणी ची झाडी आहे . हिच्या मधोमध नर्मदा माई वाहते आहे . खाली महाराष्ट्र आणि वरती गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमा आहेत . महाराष्ट्रातील तोरणमाळ अभयारण्य , गुजरात मधील शूलपाणेश्वर अभयारण्य आणि गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील रतनमहल अस्वल अभयारण्य हा सर्व शूलपाणी झाडीचाच भाग आहे . हाफेश्वर हा झाडीचा मध्यभाग असून लाल रंगाने दाखवला आहे .  इथून पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत . मला देवा दादा ने सर्व मार्ग समजावून सांगितले होते . प्रत्येकाला आपला मार्ग निवडता यावा म्हणून सर्वच मार्ग इथे व्यवस्थित देतो आहे . कृपया नीट अभ्यासावेत . सर्वात पहिला मार्ग जो खरा परिक्रमा मार्ग होता तो आता १००% जलमग्न झाला आहे याची कृपया नोंद घ्यावी . त्यामुळे जुन्या पुस्तकांमध्ये सापडणारे उल्लेख आणि मंदिरे तुम्हाला इथे आता सापडणार नाहीत .  किंबहुना सरदार सरोवर धरणाची उंची दर काही वर्षांनी थोडी थोडी वाढवली जात आहे त्यामुळे

लेखांक १२८ : कडीपानी ची कडी परीक्षा व जलमग्न कलहंसेश्वर अर्थात हाफेश्वर

इमेज
वाजेपूरची बावडी सोडली आणि पुढे तलाव लिंबडी रायसिंगपुरा बुंजर चिखली अशी गावे पार करत कडीपानी या ठिकाणी आलो . हे सर्व आदिवासी क्षेत्र आहे . डोंगराळ प्रदेश ,कठीण माणसं ! मध्ये रायसिंगपुरा या गावामध्ये एक मूर्तिकार भेटला . त्याचे नाव होते नागिनभाई कोदरभाई सिलावट . याने मला चहा पिण्यासाठी घरी बोलावले . चक्क मराठी भाषेमध्ये बोलत होता ! नंतर कळाले की याच्या सौभाग्यवती नंदुरबार जिल्ह्यातल्या असल्यामुळे याला मराठी येत होते . मूर्ती बनवण्यासाठी हा महाराष्ट्र मध्ये फिरलेला होता . तसा हा पूर्वीचा महाराष्ट्राचाच भाग ! नवीन राज्य रचनेमुळे मध्य प्रदेश आणि गुजरातला मिळालेला . पूर्वी गुजरातचा विस्तार मुंबईपर्यंत होता . आता सुद्धा कानबेडा या गावातून मी एक गंमत पाहिली होती आणि तिची नोंद डायरीमध्ये केलेली आहे ! या गावावरून दर पाच मिनिटाला एक विमान उडत होते . साधारण उडाण्याची दिशा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हा बहुतेक मुंबई ते कर्णावती (अहमदाबाद ) हवाई मार्ग आहे . अशा अनेक गमतीशीर गोष्टी परिक्रमेमध्ये दिसायच्या . लिहून ठेवल्या तेवढ्या लक्षात राहतात . बाकीच्या हळूहळू विस्मरणात जातात . रायसिंग पुरा गावाम