पोस्ट्स

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १६० : भारकच्छचे नर्मदाप्रसाद शर्माजी आणि अवंतिका धाम बिसेरचे बजरंगगिरी जी

इमेज
नांदनेर गाव सोडल्यावर एक छोटासा पूल लागतो . हा पूल उत्तरेचे बख्तरा आणि दक्षिणेचे बाबई ही गावे जोडतो . सुंदर असा किनारा याही भागात आपली सोबत करतो . आखीव रेखीव शेती आणि वाळूचा किनारा ! कधी मातीचा कडा आणि भरपूर झाडी ! क्वचित कधी काटे कुटे आणि मध्ये येणारे ओढे नाले नद्या घाट . इतकी सोपी आहे नर्मदा परिक्रमा ! इथे डावीकडे एका शेतातून आत गेल्यावर परमहंस आश्रम आहे . मी काही इथे थांबलो नाही . परंतु थकला भागलेला परिक्रमावासी इथे मुक्काम करू शकतो . नांदनेर गाव संपल्यावर नर्मदा मातेवर लागणाऱ्या पुलावरून नर्मदा नदी अशी दिसते . या भागामध्ये वाळूच्या प्रचंड साठ्यांमुळे काही ठिकाणी नर्मदामाता केवळ काही फुटातून वाहते इथे वाहणारे पाणी अत्यंत खोल आणि वेगवान आहे .  वाळूचे अतिप्रचंड साठे असल्यामुळे इथे पात्र फारच लहान लहान होत जाते . पुढे कुसुमखेडा नावाचे गाव लागते . या गावांमध्ये सत्यनारायण भगवंताचे मंदिर आहे . मंदिर अतिशय सुंदर असून आतमध्ये अप्रतिम रंगकाम व कलाकुसर केलेली आहे . सत्यनारायण भगवंताची मूर्ती देखील छोटीशीच परंतु सुंदर आहे .स्कंदपुराणातील रेवाखंडामध्ये सत्यनारायण भगवंताची कथा येते . त्यामु...

लेखांक १५९ : हथनोरा जैत नांदनेर भारकच्छ गादरवास , परिक्रमेतील सर्वात सुंदर काठाने प्रवास

इमेज
शहागंज चिंचली सोडले आणि मस्त किनाऱ्याचा रस्ता पकडला . इथून पुढे नर्मदा मैया उथळ आणि त्यामुळे वेगवान होत जाते . वाळूमुळे नर्मदा मातेचे पात्र बुजून उथळ झाले आहे . काठाकाठाने चालत बनेटा गाव पार केले आणि एक मोठे झोकदार वळण घेत हतनोरा गावामध्ये आलो . इथे अतिशय सुंदर जागेवरती एक अप्रतिम आश्रम होता . या ठिकाणी अमावस्येचा भंडारा सुरू होता . तो प्रसाद घेतला आणि नर्मदा मातेच्या काठाच्या बाजूला असलेल्या ठिकाणी येऊन बसलो . इथून नर्मदा मैया काहीच्या काही सुंदर आणि समान दिसत होती ! आपल्यापैकी ज्यांनी कधी भोर शहराकडे जाताना लागणारे नदीचे प्रसिद्ध वळण पाहिले असेल त्यांच्या लक्षात माझे म्हणणे येईल . अगदी तशीच वळणदार नर्मदा नदी परंतु त्याच्यापेक्षा कैक पटीने ने भव्य दिव्य इथे दिसत होती ! समोरचा किनारा वाळूचा होता . इथूनच प्रसिद्ध धनुष्य घाटाचे धनुष्य सुरू होते इथे केरळी संन्यासी अर्थात दास स्वामी देखील आले . पटेल नावाचे आजचे अन्नदाता होते यांची मुले अतिशय गुणी आणि कामसु होती . या आश्रमामध्ये एक पाठीचा कणा वाकलेले महात्मा व अन्य काही गांजा ओढणारे शिष्य होते . दास स्वामी सारखा संन्यासी तिथे आला परंतु यांन...