पोस्ट्स

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

इमेज
( अनुक्रमणिका ) नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . .  श्री नर्मदा परिक्रमा !  २५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला ...

लेखांक १४४ : जलूदच्या जंगलातील एकांतप्रीय नागा बाबा आणि पथराडचे हनुमान

(अपूर्ण) जगातील पहिले शिवलिंग मानले जाणारे गुप्तेश्वराचे स्थान मला फारच पवित्र वाटले . इथून पुढे निघालो आणि थोड्याच वेळात नर्मदा मातेवर एक पूल लागला . या पुलावरून ओंकारेश्वरला जाता येते . तो मागे टाकून डावीकडे वळलो . इथे शेजारी लेपा बांध किंवा मंडलेश्वर चा बांध असल्यामुळे मग याच्या जवळून जाता येत नाही . पंधरा पंधरा फूट उंच भिंतींची कुंपण घालण्यात आलेली आहेत . समोरच्या बाजूने चालताना अर्थात दक्षिण तटावरून चालताना मी लेपा बांधाची हीच भिंत चढून उतरलो होतो परंतु या बाजूला ते करता येणे शक्य होत नाही . इथून पुढे गेल्यावर १९७० साली इंदोर शहरासाठी बनवलेली प्रसिद्ध उपसा जल योजना लागते . तीन मोठाल्या नळ्यांमधून अर्थात पाईपलाईन मधून एक हजार अश्वशक्तीच्या आठ मोटर्स दिवस-रात्र पाणी उपसून इंदोर शहराला पाठवीत आहेत ! इथे एका गुप्त जागी एक साधू तपाचरण करीत बसलेले आहेत असे मला कळाले त्यामुळे ती जागा शोधायची असा निश्चय करून मी रस्ता सोडून जंगलामधून चालू लागलो . इथे खूप घनाघाट झाडी आहे . हे जलुद नावाचे गाव होते . लीपा बांध होणार म्हणून गाव इथून उठवले गेले परंतु बांधकाम पूर्ण झाला नाही .कर्मचाऱ्यांचे पगारह...

लेखांक १४३ : टेंबे स्वामी आणि गोंदवलेकर महाराजांच्या स्मृतीने पावन मंडणमिश्रांचे मंडलेश्वर आणि जगातले पहिले शिवलिंग गुप्तेश्वर

इमेज
काठा काठाने चालताना खडक संपला आणि मऊ माती सुरू झाली . एखादे मोठे शहर जवळ आल्याच्या खुणा दिसू लागल्या . दुर्दैवाने या सर्व खुणा अतिशय वाईट आणि निंदनीय अशा आहेत . सर्वप्रथम माशा घोंगावू लागल्या . तदनंतर प्लास्टिकचा कचरा दिसू लागला . नर्मदा मातेच्या पाण्याचा प्रवाह दूषित भासू लागला . थोड्याच वेळात अतिशय घाणेरडे पाणी थेट मैया मध्ये नेऊन टाकणारे नाले आडवे येऊ लागले . त्यातच पाणी उपसणारी डोहकुपे बांधलेली दिसत होती . नक्की कुठले पाणी हे लोक पीत होते काय माहिती ! कसेबसे ते घाणेरडे नाले पार केल्यावर एक छोटासा रस्ता लागला . हे मंडलेश्वर नावाचे गाव होते . महेश्वर मंडलेश्वर ही तशी जोड गोळी . मंडलेश्वर म्हणजे प्राचीन महेष्मती नगरी ची मंडल गल्ली होती असे म्हणतात . आद्य शंकराचार्य जेव्हा धर्मप्रसारासाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांना आपल्या बुद्धी सामर्थ्याने आणि युक्तिवादाने जेरीला आणणारे मंडण मिश्रा आणि त्यांची पत्नी भारती मिश्रा यांचे हे गाव .अर्थातच शंकराचार्य हा शास्त्रार्थ जिंकले होते . आणिआज आपण कुंभमेळा किंवा पंचदशनामी आखाडे वगैरे जे काही पाहतो त्याची सुरुवात या शास्त्रार्थानंतरच झाली होती . ...

लेखांक १४२ : जालेश्वर कालेश्वर आणि परशुरामाने परशु धुतला त्या लाडवी चा तत्कालेश्वर

इमेज
महेश्वर चा घाट सोडला तरी त्याचे गारुड मनावर कायम होते ! आणि कायम राहील ! जगातील उत्तम उदात्त उन्नत सुंदर गोष्टींचे असेच असते ! त्या लवकर तुमच्या विस्मरणामध्ये जाऊ शकत नाहीत ! त्या समजून घेण्यासाठी मेंदूचे अधिकाधिक भाग वापरले गेलेले असतात ! त्यामुळे त्यांचा ठसा देखील मेंदूमध्ये खोलवर उमटलेला असतो .  महेश्वर घाटावरून निघाल्यावर काशी विश्वनाथा चे दर्शन घेतले . हा घाट देखील सुंदर व सुबक होता . मंदिराचे सोनेरी खांब दुरून छान दिसायचे . इथे अनेक छोटे मोठे देव आणि मंदिरे आहेत . न कंटाळता सर्वांची दर्शने घेतली . नर्मदा परिक्रमेसाठी आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा किंवा एकंदरीतच आयुष्यात सर्व वेळ केवळ आणि केवळ वर्तमान काळातच जगावे असे मला वाटते . नाहीतर घरात बसलेले असताना परिक्रमेला जाण्याची घाई आणि परिक्रमेला आल्यावर घरी परतण्याची घाई असे करू नये . आपण काही रोज रोज नर्मदा परिक्रमा करत नाही . त्यामुळे वाटेमध्ये येणारी मंदिरे ही काही आपल्याला सतत दिसणार नसतात . त्यामुळे कितीही पुनरावृत्ती झाली आणि कितीही कंटाळा आला तरी प्रत्येक मंदिरामध्ये जावे आणि दोन हस्तक तिसरे मस्तक आवर्जून जोडावे . प्रत्...